रुतल्या काट्यांचा घाव असह्य होतो
रुजल्या जखमांचा भार सलतो का रे ??
विरहाचा भाव काळीज भेदून जातो
प्रेमाचा मनात डाव रंगतो का रे ??
भावबंध फुटून पापण्यांची सीमा गाठतो
अश्रूंना सावरताना गळा दाटतो का रे?
स्वप्नसुखाचे इंद्रधनुषी चित्र कोरतो
दुःख भयाने मन चिंततो का रे??
जगणे आता सोशिक करू नको
आवर मनासी तू घालतो का रे??
अमिता...
#marathi