वाद-संवाद
जिथे पेटतो वाद, तिथे संपतो संवाद
शब्दांची होते झुंज, टोकाचा होतो नाद....
अपेक्षांचा सलतो भार , आक्षेपांना येते उधाण
शब्दांनीच होतो वार, हरवतात मान- सन्मान....
अनावर अश्रूंचे निर्झर , स्त्रवतात पुन्हा झरझर
विरून जाता तो अंगार, मनावर फुंकर अलवार....
आयुष्याच्या सांजवेळी, गिळून टाक मीपण
मनात उरलेला संदेह , सोडवू प्रेमाने आपण....
अमिता✍️
©Amita
#StandProud
#मराठीकविता