जरी सगळे तुला सोडून गेले
मी कायम सोबत असेल..
असतील जेव्हा स्मशानात सारे
तेव्हा मी या जगात नसेल..
हातात हाथ घेऊनी रस्ता
एका वळणावरती संपेल..
सोबतीच्या प्रवासाला
आनंद नक्की जिंकेल ..
तुझ्या माझ्या नात्याला
मी नाव काय देऊ..
नावाविना निभवण्याची
शपथ आपण घेऊ..
नावाविना निभवण्याची
शपथ आपण घेऊ..
प्रितम..
©गोरक्ष अशोक उंबरकर
मैत्री