अनोळखी जगात या
मन कुठेतरी स्थिरावते..
जीवनाचे गणित सारे
या प्रवासात हरवते..
क्षणांच्या भेटीत काही
आपलेसे वाटते..
अनोळखी जगात सारे
जणू आपलेसे भासते ..
स्पर्धेच्या या धावपळीत
क्षणभर थांबावे वाटते..
मैत्रीच्या नात्यात या
जरावेळ रमावे वाटते..
मनमोहक सौंदर्याच्या
प्रेमात पडावे वाटते..
मैत्रीच्या अनमोल नात्याला
कायम जपावे वाटते..
©गोरक्ष अशोक उंबरकर
कॉफी