ज्या दिवशी माझ्या देशातील स्त्री सुरक्षित असेल,
तिच्यावर बलात्कार,विनयभंग होणार नाही,
ती अपरात्री मनात भीती न ठेवता वावरू शकेल,
ज्या दिवशी स्त्रीला मुक्त स्वातंत्र्य मिळून
ती स्त्री नसून पुरुषा समान एक निसर्गाने
जन्माला घातलेली मानव आहे,
ज्या दिवशी स्त्री पुरुष भेदभाव संपेल
अन गर्भातली कळी वंशाची पणती समजली जाणार
त्या दिवशी रक्षाबंधनला खरा अर्थ प्राप्त होणार
ती खरी रक्षाबंधन असेल.
महाराष्ट्राचा काव्य सम्राट
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
( विद्रोही राजन)
©rajan gawali
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here