जन्मदिवस बाबाजींचा
******************
******************
कवी:डॉ.श्री.संतोष भानुदास गायकवाड (पालखेडकर).
ललित पंचमीच्या या शुभ दिवशी दहेगावी,
पुत्ररत्न पाटील कुळी माता म्हाळसाई च्या पोटी,
जगद्गुरु संत जनार्दन स्वामी महान शिवभक्त जन्मले,
रात्र अन् दिवस सतत बारा वर्ष खडतर तप केले त्यांनी,
चाले जप तप अखंड शिवनाम ओठी,
अपंग झाले पद त्यांचे तरीही सोडली नाही शिवभक्ती,
पाहून त्यांची ही अतूट शिवभक्ती प्रसन्न झाले शिवपार्वती,
बांधून शिवालये,आश्रमशाळा,विद्यालये कित्येक ठिकाणी, भक्तांना देवून आशीर्वाद पाजले बाळकडू शिवणामचे,
उध्दार केला पाटील कुळाचा कल्याण केले मानवजातीचे,
नाव अजरामर झाले त्यांचे कित्येकांचे संसार थाटले,
पोटी नव्हते संतान कुणाला,बाबाजी चे उदी प्रसादाने पुत्र पुत्री कुलदीपक भक्तांना मिळाले,जगी जनार्दन नाव प्रकटले,
कुणास भूतबाधा,कुणास झाला सर्पदंश,कुणास वाटे भीती,
रक्षण त्यांचे होत असे आपोआप जे जे नाम त्यांचे घेती,
राष्ट्रसंत जगद्गुरु थोर शिवभक्त स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी दैवत प्रिय भुवनी आहे प्रचंड त्यांची ख्याती,
नुसते नावच तुम्ही घ्या बाबाजिंचे जय जनार्दन होईल तुमचे साकार अशक्य ते शक्य सर्व मनोकामना पूर्ण होईल स्वप्न,
नका विसरु नका सोडू बाबाजींच्या निष्काम विधीला,
आठवा आठवा तो क्षण बाबांनी सांगितलेल्या प्रवचनाचा, अवतार तो जगदीश्वराचा शिवाचा स्वामी जनार्धनाचा,
नका नका विसरू तुम्ही कधी त्यांच्या या महान कार्याला,
घ्या मुखी नाम सतत बाबाजींचे करा अभिवादन या महान संताला त्यांच्या या अमर विभुतीला स्मृतीला,
मिळाला संजीवनी गुरुमंत्र ओम जनार्धनाय नमा,
जप तप करा शिभक्ती शिवनाम क्षणो क्षणी उठता बसता,
करा समृद्ध सुखी आनंदी सदा सर्वकाळ या जीवनाला,
नका नका विसरू रे तुम्ही माझ्या स्वामीला जनार्धनाला.
©santosh gaikwad
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here